राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा विकेंड लॉकडाउन केला जाणार आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधून या संबधी माहिती दिली.
प्रवास :
लोकल ट्रेन सुरू राहणार असून, अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रिक्षामध्ये प्रवास करताना ड्रायव्हर + 2 लोक आवश्यक ,
बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल.
टॅक्सीत मास्क घालावा लागेल.
कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना
विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
पाहा कोणत्या गोष्टीवर निर्बध येणार
जिम बंद होणार असून, रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील .
सिनेमागृह, नाट्यगृह, गार्डन, मैदाने संपूर्णत: बंद, जिथे कोरोना केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला .
सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही
मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी
बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल
शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील
प्रतिबंधित क्षेत्र तयार करा
सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार
20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी
लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित
Comments
Loading…